खानापूर तालुक्यातील हलगा आणि मेरडा परिसरात दहा हत्तींच्या कळपाने हैदोस घालून हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान केले आहे.
दांडेली जंगलातून दहा हत्तींचा कळप खानापूर तालुक्यातील हलगा आणि मेरडा परिसरात दाखल झाले असून दोन दिवसापासून या परिसरात हत्तींनी मुक्काम ठोकला आहे. हत्तींच्या कळपात एक टस्कर असून दोन पिलांचा समावेश आहे.हा हत्तींचा कळप शेतातील भात पिकाचे आणि उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहे.काही ठिकाणी कापून ठेवलेल्या भात पिकावर हत्तींनी ताव मारला आहे.
हत्तींच्या आगमनामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .शेतात कामासाठी जायचे देखील हत्तीमुळे त्रासदायक झाले आहे.यावर्षी पाऊस अगदी जेमतेम झाल्याने भात पीक देखील कमी आहे.त्यातच हत्ती आल्यामुळे थोडेफार भातपीक देखील हातातून जाणार अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.वन खात्याचे पथक हत्तीच्या कळपाला दांडेली जंगलात हुसकवण्याचे प्रयत्न आहेत.