This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

* येळ्ळूर गावाची कन्या उत्तर कन्नड जिल्हा, हल्ल्याळ तालुक्यात बारावीच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक 96.02 टक्के गुण : घवघवीत यश संपादन*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगांव : के. एल. एस. पदवी पूर्व महाविद्यालय हल्याळ तालुका हल्ल्याळ , जिल्हा कारवार येथील विद्यार्थिनी कु. गौरी रावजी पाटील या विद्यार्थिनीने पदवी पूर्व महाविद्यालय बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेमध्ये विज्ञान शाखेतून महाविद्यालयात प्रथम आणि हल्ल्याळ तालुक्यामध्ये 96.02 टक्के गुण घेऊन विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक घेऊन मोठे घवघवीत यश संपादन केले आहे. बायलॉजी मध्ये 100 गुण पैकी 100 , मॅथेमॅटिक्स मध्ये 100 पैकी 99 गुण, फिजिक्स आणि केमिस्ट्री 100 पैकी 98 गुण, इंग्लिश मध्ये शंभर पैकी 93 गुण, आणि हिंदी मध्ये 100 पैकी 88 गुण घेऊन हल्याळ तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. गौरी रावजी पाटील हिच्या संपादन केल्याल्या यशामुळे संपूर्ण हल्ल्याळ तालुक्यासह कारवार जिल्हा आणि बेळगाव जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव व अभिनंदन होत आहे.

मिलाग्रिस इंग्रजी माध्यमिक विद्यालय हल्याळ, ता हल्याळ येथील विद्यार्थिनी कु. गौरी रावजी पाटील या विद्यार्थिनीने इयत्ता दहावी मध्ये सुध्दा 99.04 ट्टके ( गुण – 625 पैकी 619 मार्क ) घेऊन उत्तीर्ण होऊन उत्तर कन्नड जिल्हा तालुका हल्याळ येथे प्रथम क्रमांक घेऊन घवघवीत यश मिळविले होते; हाच आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून अतिशय प्रामाणिकपणे अभ्यास करून बारावीच्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रथम क्रमांक घेतले आहे.

तर गौरी रावजी पाटील यांच्याशी संवाद साधताना ती म्हणाली; या दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षेमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने नियोजनपूर्वक अभ्यास करून घेऊन यशाचे शिखर गाठले आहे त्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा असा आहे. अभ्यासामध्ये नियोजनपूर्वक अभ्यासाचा आराखडा आणि वेळापत्रक तयार करून घेऊन अभ्यास केल्यामुळे निश्चित ध्येय गाठण्यासाठी अधिक वेळ लागणार नाही हे या यशामुळे दिसून येते आहे. कोणतीही जिद्द मनात ठेवली तर कोणतेही यश गाठायला अधिक वेळ लागत नाही प्रामाणिक प्रयत्न आणि अभ्यासात सातत्य ठेवून नियमित अभ्यास केल्यास कोणताही विषय अजिबात जड जात नाही त्यामुळे यश मिळायला वेळ लागत नाही. दैनंदिन जीवनात यशस्वी होण्यासाठी खडतर प्रयत्न केल्याशिवाय यश नाही हे गौरी रावजी पाटील हिच्याशी संवाद साधत असताना हिने अतिशय मार्मिक उत्तर देताना सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक थोर समाज सुधारक आणि महामानवांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श घेऊन तसेच माझे आई – वडील, गुरुजन आणि नातेवाईक , समाजातील मान्यवर मोठी मंडळी व लहान व्यक्ती यांच्याकडून मिळालेले प्रोत्साहन आणि मार्गदर्शन अतिशय मोलाचे माझ्या जीवनात आहे हे विचार माझ्या आयुष्यामध्ये सतत ठेवून जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी मी वाटचाल करणार आहे.

गौरी रावजी पाटील ही यल्लुर , तालुका बेळगाव येथील रहिवासी असून अभियंता आणि सामाजिक कार्यकर्ते रावजी पाटील व भारती पाटील यांची कन्या आहे. प्राचार्या अनुप्रिया मॅडम , प्राचार्य विशाल करंबळकर सर आणि सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशामुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now