सध्या जगभरातच डासआणि डासवर्गीय किटकांमुळे लोक त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणांहून अशा बातम्या कानावर येतच असतात. भारतातही हे नुकत्याच एका सर्व्हेतून समोर आले आहे.
नुकताच भारतीयांच्या उत्पादनक्षमतेवर एक सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेतून एका अतिशय धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. भारतात तब्बल निम्म्याहून अधिक लोक हे डासांमुळे हैराण झालेले आहेत .डासांच्या चाव्यामुळे जनता हैराण झाली आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या कामावर होऊ लागला आहे,
डास चावून होणाऱ्या झोपमोडीमुळे तब्बल ५८ टक्के भारतीयत्रस्त असून, अपुऱ्या झोपेमुळे भारतीयांमध्ये थकवा येण्याचंप्रमाण वाढल्याचं एका सर्व्हेमध्ये आढळून आलं आहे.
या सर्व्हेदरम्यान डासांमुळे झोपेत येणाऱ्या व्यत्ययाचा कामाच्या उत्पादनक्षमतेवर परिणाम होतअसल्याचे ६२ टक्के पुरुष आणि ५३ टक्के स्त्रियांनी सांगितले. भारत आर्थिक प्रगतीच्या वाटेवर असताना, कर्मचारी वर्ग निरोगी असणे आवश्यक असताना या पार्श्वभूमीवर हे चित्र धोकादायक असल्याचे बोलले जात आहे.