सांडपाणी प्रकल्प ताबडतोब बंद करावा यासाठी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलनं
सांडपाणी प्रकल्प ताबडतोब बंद करावा या मागणीसाठी आज हलगा अलार्मड ब्रिजवर सर्व शेतकरी एकत्रित आले आणि त्यांनी धरणे आंदोलन छेडले.
यावेळी शेतकरी म्हणाले की सांडपाणी प्रकल्पासाठी संपादित केलेल्या शेत जमिनीची नुकसान भरपाई सरकारने लागलीच द्यावी. या प्रकल्पाकरिता 2013 साली सुपीक शेत जमीन संपादित करण्याकरिता जमीन मालक शेतकऱ्यांना एकरी तीन लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती मात्र अजूनही होती शेतकऱ्यांना अदा करण्यात आली नाही.
त्यामुळे या नुकसान भरपाई कविता शेतकऱ्यांनी बेमुदत धरणे सत्याग्रह सुरू केला. तसेच आंदोलना आधी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी सांडपाणी प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांना बाहेर काढून प्रकल्पाचे काम बंद केले.
यावेळी शेतकरी यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन छेडण्यात आले होते यावेळी या आंदोलनाकरिता मारुती कानोजी बसवराज पाटील भरतेश बेल्लर महावीर वेल्ल राजू मरकल शंकर देवलत्तर यासह आदी शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.
त्यानंतर शेतकऱ्यांनी सांडपाणी प्रकल्पासंदर्भात आपले मत व्यक्त केले. आणि म्हणाले की 2013 मध्ये हलगा गावा नजीकच्या सुपीक शेत जमिनीला अतिशय कमी म्हणजे प्रति एकर तीन लाख रुपये इतकी नुकसान भरपाई निश्चित करण्यात आली होती मात्र ते सरकारने अजून भरपाई दिली नाही त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे.
आमची नुकसान भरपाई त्वरित द्या अन्यथा आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडू. त्याच बरोबर जोपर्यंत आपल्याला नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत या प्रकल्पाचे काम आम्ही होऊ देणार नाही असे यावेळी ठणकाम सांगितले.