बेळगांव:भुखंड विक्रीच्या रकमेचा व्यक्तिगत व्यवहार मिटविण्यासाठी काही तरुण लक्ष्मी कॉम्प्लेक्सजवळ जमले होते. परंतु, व्यवहार मिटण्याऐवजी त्यांच्यात वादावादी सुरू झाली. सर्वजण एका तरुणाला बेदम मारहाण करत होते, तर काहीजण सोडविण्याचा प्रयत्न करत होते. बुधवारी (दि. २०) सायंकाळी सदाशिवनगरात घडलेल्या या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव देऊन गर्दी हटविली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बॉक्साईट रोडला लागून एका व्यक्तीची पाच एकर शेतजमीन आहे. भूखंड पाडून ती विकून देण्याची हमी चौघा तरुणांनी घेतली. त्यानुसार काही भूखंडाची विक्रीही झाली. परंतु, शेतजमीन मालकाला रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात होती. हा व्यवहार मिटविण्यासाठी काही तरुण लक्ष्मी कॉम्प्लेक्सजवळ जमले होते. परंतु हा व्यवहार सुरू मिटण्याऐवजी वादावादी झाली. त्याचे पर्यावसान हाणामारीत तरुण झाले. हल्ला झाला तो शेतजमीन असलेल्या व्यक्तीची रक्कम होता, सर्वांनी द्या, हे सांगण्यासाठी आला असे समजते.
त्याच्यावर अचानक हल्ला चढविल्यानंतर गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच एपीएमसीचे निरीक्षक ख्वाजा हुसेन यांनी घटनास्थळी भेट दिली. भांडण करणाऱ्या काही तरुणांना त्यांनी पोलिस ठाण्यात नेले. मात्र, मारहाण झालेल्या तरुणाने रात्री उशिरापर्यंत पोलिसांत फिर्याद दिली नसल्याने घटनेची नोंद झाली नव्हती. फिर्यादी तरुण व त्याच्या वकिलांनी गुरुवारी फिर्याद देणार असल्याचे निरीक्षक हुसेन यांना सांगितले आहे.