धारवाडचे सहाय्यक पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) श्री राजीव एम यांना अंजली अंबिगरच्या हत्येप्रकरणी राज्य सरकारने निलंबित केले आहे.ते निलंबन मागे घ्यावे या मागणीसाठी युनियन ऑफ पीपल्स ऑर्गनायझेशनच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवदेवन देण्यात आले.
एका कार्यक्षम दलित पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन, त्याने काहीही चुकीचे केले नसतानाही, दलित समाजातील निष्ठावान अधिकाऱ्याला जातीवादी आणि अदृश्य हातांच्या दबावाचा बळी बनवण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे दिसून येते असे यावेळी निवेदनात सांगण्यात आले .
ज्या अधिकाऱ्यांची पदोन्नती खपवून घेतली जात नाही आणि ज्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात कोणतेही गैरकृत्य केले नाही अशा अधिकाऱ्यांवर कारवाई न करता कार्यक्षम अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या हेतूने घडवून आणण्यात आला आहे
त्यामुळे ताकार्यक्षम अधिकाऱ्याच्या विरोधात शासनाने काढलेला निलंबन आदेश मागे घ्यावा अशी विनंती संपुर्ण बेळगाव जिल्हयातील वतीने करण्यात आली आहे.