बेळगांव:आमचे सरकार जातीय दंगली दडपण्याचे काम करत आहे असे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी हे बंगळूर मध्ये बोलताना सांगितले की, यावेळी म्हणाले कि कोणी जातीय दंगल केल्यास आम्ही कडक कारवाई करू.
शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘बेळगाव शहरातील आळवाण गल्ली येथे लहान मुले क्रिकेट खेळत असताना सुरू झालेला हाणामारी मोठ्यांच्या भांडणे वाढली आणि दोन ग्रुप मध्ये झालेल्या गटबाजीत दगडफेक झाली. या दंगलीप्रकरणी शहपूर पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
लहान मुले क्रिकेट खेळत असताना सुरू झालेल्या भांडणाचे रूपांतर मोठ्यांसाठी आपत्तीत झाले आणि दोन समाजात गट हाणामारी झाली. या प्रकरणाला जाती-धर्माच्या रंगात पाहू नये. काही लोक जाती-धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत, हा घातक आहे. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी जनतेला आवाहन केले आहे. या कठीण काळात आपण सर्वांनी एकजूट आणि सतर्क राहू या.
कोणत्याही परिसरात बेकायदेशीर कृत्ये होत असल्यास त्याची माहिती पोलीस विभागाला द्यावी व कोणीही कायदा हातात घेऊ नये. बेळगावच्या शांततापूर्ण वातावरणात बाहेरच्या लोकांकडून जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच जातपात रंगविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची दहशत निर्माण करणाऱ्या जातीय दंगलखोरांचे म्हणणे न ऐकता बेळगाव शहरात शांतता राखावी, अशी विनंती मंत्र्यांनी जनतेला केली आहे.