बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी नेहरू नगरला भेट देऊन परिसराची पाहणी करून तेथील रहिवाशांच्या तक्रारी ऐकल्या.
या भेटी प्रसंगी त्यांनी परिसरातील घरांच्या परिस्थितीवर चर्चा केली .नंतर त्यांनी संबंधित मंत्र्यांशी परिस्थितीबद्दल बोलून पंतप्रधान आवास योजनेद्वारे प्रश्न सोडविण्याच्या समस्येवर चर्चा केली.
यावेळी परिसरातील नागरिकांशी बोलताना ते म्हणाले की घराची तक्रार ही चिंतेची बाब असून याला माझे प्राधान्य असेल, नागरिकांची ही परिस्थिती निवळेल आणि लवकरच यावर तोडगा काढता येईल असे सांगितले . यासाठी मी वैयक्तिकरित्या संबंधित लोक आणि परिसरातील रहिवाशांच्या संपर्कात राहीन असे ग्वाही दिली