तुटून रस्त्यात पडलेल्या विद्युतभारीत तारेचा स्पर्श झाल्याने दुचाकी जळून खाक झाली तर दुचाकीस्वार उडून पडल्याने जखमी झाला.
खानापूर तालुक्यातील दोड्डहोसुर येथे ही घटना घडली.सागर नारायण पाटील असे जखमीचे नाव आहे.सागर पाटील हा शेतातील भाताची मळणी करून परतत होता.त्यावेळी रस्त्यावर तुटून पडलेल्या विद्युतभारीत तारेचा स्पर्श झाल्याने धक्का बसून तो दुचाकीवरून उडून पडला.पडल्यावर तो दहा मिनिटे बेशुद्ध होता.दहा मिनिटाच्या नंतर तो शुद्धीवर आल्यावर त्याला आपल्या दुचाकीने पेट घेतल्याने समजले.विजेचा जोरदार धक्का बसल्याने सागर याला चालता येत नव्हते.
कसाबसा तो गुडघ्यावरून सरपटत तो थोड्या अंतरावर गेला आणि त्याने आपल्या मित्राला घडलेली घटना सांगितली.नंतर त्याचे मित्र घटनस्थळी दाखल झाले आणि त्यांनी त्याला खानापूर शासकीय रुग्णालयात दाखल केले.तेथे प्रथमोपचार केल्यावर त्याला पुढील उपचारासाठी बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.