शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मिळाले यश :शेतकऱ्यांच्या समस्या केंद्र सरकारला पाठविणार
शेतकऱ्यांना ज्या समस्या उद्भवल्या आहेत त्याचे निराकरण करण्याकरिता सर्व शेतकरी बांधवांनी एकत्रित येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. तर आज जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयात शेतकऱ्यांसोबत बैठक बोलावली होती. जिल्हाधिकाऱ्यांची शेतकऱ्यांनी साधक बाधक चर्चा केली.
यावेळी डी मीडिया शी बोलताना शेतकरी नेते राजू मरवे म्हणाले की जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या सर्व त्या समस्या सांगितल्या आहेत . यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रोजगार योजनेमध्ये शेतकऱ्यांना काय समस्या आहेत विचारणा केली आणि आपण केंद्र सरकारकडे आपल्या मागण्या पोहोचवू असे सांगितले.
रोहियो योजना अंतर्गत च्या महिला आहे ते इतर काम करत असतात त्यामुळे शेतकऱ्यांची कामे अडतात. त्यामुळे रोजगार योजना ही शेतीच्या कामासाठी राबवावी जेणेकरून शेती करिता ही कामे अनुकूल होतील अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
त्याचबरोबर पंतप्रधान फसल विमा योजना याचे पैसे शेतकऱ्यांना अद्यापही आले नाही .2022 मध्ये जी नुकसान भरपाई झाली होती त्याकरिता फसल विमा अनेक शेतकऱ्यांनी उतरवला होता मात्र त्याची अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे यावेळी बोलताना राजू मर्वे यांनी सांगितले.