अधिवेशन करिता बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांचे मोठे हाल होत आहेत. पोलिसांना राहण्याकरिता तसेच विश्रांती घेण्याकरिता तंबू देखील व्यवस्थित नसल्याने पोलिसांचे हाल होत आहेत तसेच त्यांना चांगला नाश्ता जेवण देखील उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या आरोग्याची हेळसांड करण्यात येत आहे.
इतकच नाही तर पिण्याचे पाणी देखील नसल्याने पोलिसांची मोठी गैरसोय झाली आहे. जेम तेम चार दिवस उलटले असल्याने पोलिसांचे इतके मोठे हाल झाले आहेत तर येणाऱ्या आणखीन सहा दिवस कसे काढायचे असा प्रश्न सध्या पोलिसांसमोर उभा राहिला आहे.
त्यामुळे पोलिसांच्या मुखातून अधिवेशन नको रे बाबा असे ऐकावयास मिळत आहे. सध्या हलगा येथील सुवर्ण विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलने येत नसल्याने पोलिसांना थोड्या प्रमाणात का होईना विश्रांती मिळाली आहे मात्र राहण्याची खाण्याची पिण्याची व्यवस्थित सोय नसल्याने त्यांचे मोठे हाल होत आहेत.