सरकारने आठ दिवसांपूर्वी एक निर्णय घेतला होता. ज्या शाळेमध्ये दोनशेहून अधिक विद्यार्थी आहेत त्या शाळेमध्ये क्रीडा शिक्षकेची नेमणूक करण्यात यावी तसेच कमी पटसंख्या असलेल्या शाळेत शिक्षकांची नेमणूक करायची नाही असा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र हा निर्णय चुकीचा असून विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची तक्रार चलवेनहट्टी येथील एसडीएमसी सदस्य यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी बोलताना एसडीएमसी सदस्य मनोहर हुंदरे बोलताना म्हणाले की एखाद्या सरकारी शाळेचे विद्यार्थी क्रीडा प्रकारात आपले नावीन्य दाखवत असेल आणि त्या शाळेची पटसंख्या जर कमी असेल तर हा विद्यार्थ्यांवर एक प्रकारचा होणार अन्याय आहे.
सरकार सरकारी शाळेमध्ये क्रीडा शिक्षकाच्या नियुक्ती पासून पळ वाट शोधत आहे. सरकारने याबाबत एकदा विचार करावा आणि विद्यार्थी तसेच खेळाडूंना अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी. आणि कमी पटसंख्या असलेल्या शाळेत क्रीडा शिक्षक नेमावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली .