बेळगाव. ता: बेळगुंदी येथील बालवीर विद्यानिकेतन पूर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा ही शैक्षणिक गुणवत्तेत व खेळामध्ये आघाडी घेत आहे, या शाळेतून अनेक मोठी व्यक्तिमत्व भविष्यात उत्तरोत्तर प्रगती करेल, शाळेची आता खऱ्यायार्थाने विकासाला सुरुवात झाली आहे. आर्थिक व सामाजिक बळ मजबूत करून तालुक्यात लवकरच चांगले विद्यार्थी घडविण्यास मदत करेल असा विश्वास सोशियल फॉउंडेशनचे अध्यक्ष प्रेमानंद गुरव यांनी येथे व्यक्त केला. बालवीर विद्यानिकेतन स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनावेळी ते बोलत होते.
शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रेमानंद गुरव,मराठा को.ऑफ बँक चे माजी चेरमण लक्ष्मण होनगेकर , उपाध्यक्ष बालवीर सोशिल फौंडेशन उपाध्यक्ष शंकर चौगुले, परशराम हडगल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी मोहम्मद साफी.एम काझी, आनंदा जाधव, राजू मुजावर, सौ.रिता बेळगावकर, डी.डी. बेळगावकर, सुभाष हदगल, भरमु पाटील, निंगाप्पा जाधव, परशराम हदगल, परशराम झंगरूचे, आय.जी डेकोळ्कर, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिक के. डी. पाटील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा शहापूरकार यावेळी उपस्थित होत्या. यानंतर शाळेतील उत्कृष्ट कुस्तीपट्टू रवळणाथ कनबरकर यांचा शाळेचे उपाध्यक्ष शंकर चौगुले यांच्याहस्ते शाल श्रीफळ, पुष्पहार व मानचिन्ह देउन गौरविण्यात आले. त्यानंतर अंकुर,शिशु, पहिली ते दहावीच्या विध्यार्थानी नृत्यांच्या माध्यमातून वर्षभरातील हिंदू संस्कृती परंपरा, मराठी सण, उत्सव, मनोरंजन, भावगीत,भक्तीगीत यांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. प्रास्थाविक डी डी बेळगावकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री सांवगावकर तर आभार प्रदर्शन सुष्मा ताई यांनी केले. यावेळी बालवीर परिवार,पालक वर्ग,विध्यार्थी,शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.