जय महाराष्ट्र फलक काढण्यात कानडी संघटनांना यश
अनगोळ मध्ये लावण्यात आलेला जय महाराष्ट्र चौक हा फलक महानगरपालिकेने काल सायंकाळी काढला आहे. काल महापालिकेसमोर कन्नड संघटनांनी धुडगूस घालत अनगोळ मधील जय महाराष्ट्र चौक हा फलक काढण्याची मागणी केली होती .तसेच दिवसभर महापालिकेसमोर ठाण म्हणून आंदोलन केले होते.
त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अनगोळ मध्ये दाखल होत सायंकाळी मराठी मध्ये असलेला जय महाराष्ट्र चौक हा फलक काढलेला आहे.कन्नड संघटनांच्या दबावाखाली येत महानगरपालिकेने हा फलक काढलेला आहे.
तसेच काळा फलकावर लिहिलेले मराठी शब्द सुद्धा पुसले आहेत. त्यामुळे बेळगावात पुन्हा मराठी माणसाची गळचेपी करण्यात असल्याचं दिसून येत आहे.यावेळी पोलीस बंदोबस्तात हा फलक काढला असल्याने मराठी भाषिकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली