बारावीच्या विद्यार्थ्यांचा आज शेवटच्या पेपरने सांगता झाली. गेल्या कित्येक दिवसापासून सुरू असलेल्या परीक्षेनंतर आज विद्यार्थ्यांनी मोकळा श्वास घेतला.
दुपारी परीक्षा संपल्यावर सर्व विद्यार्थ्यांनी वर्गाच्या बाहेर येताच एकच जल्लोष केला. यावेळी सर्वांनी एकमेकांवर रंगाची उधळण केली. तसेच काहीजणांनी एकमेकांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
बारावीच्या परीक्षेचा आज शेवटचा दिवस याच्यापुढे आपण वर्ग मैत्रिणी मित्र भेटणार नाही यामुळे काहीजण भावुक झालेले पाहायला मिळाले.
आता पुढील शिक्षणाकरिता आपण वेगवेगळ्या मार्गाने जाणार कोणी बीकॉम बीबीए बीएससी तर कोणी डॉक्टर इंजिनियर होणार त्यामुळे आपल्या सर्वांचे मार्ग वेगवेगळे होणार या विचारानेच काही विद्यार्थी भावूक झाले होते.
तसेच सर्वांनी हा शेवटचा क्षण अत्यंत आनंदाने घालविला. सोमवारी रंगपंचमी असल्याने रंगपंचमीच्या आधीच विद्यार्थ्यांनी एकमेकांना रंग लावून रंगांची उधळण केली. तसेच आपण पुढे नेहमी भेटत राहू आपली मैत्री अशीच जपत राहू असे म्हणून एकमेकांचा निरोप घेतला.