भारतीय सैन्याने १९७१ मध्ये बांगलादेश स्वतंत्र केला त्या प्रित्यर्थ सदर्न कमांड तर्फे सदर्न स्टार विजय रनचे बेळगाव मिलिटरी स्टेशन येथे आयोजन केले होते.बांगलादेश मुक्तीच्या वेळी झालेल्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या मॅरेथॉन रनमध्ये दोन हजारहून अधिक जण सहभागी झाले होते.
यामध्ये लष्करातील जवान,निवृत्त सैनिक,नागरिक आणि विद्यार्थी असे दोन हजार हून अधिक जण सहभागी झाले होते.मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते ध्वज दाखवून मॅरेथॉनचा शुभारंभ करण्यात आला.लष्करातील जवानांनी मॅरेथॉन मध्ये सहभागी होऊन देशाप्रती असलेली निष्ठा व्यक्त केली.मॅरेथॉन मध्ये सहभागी झालेल्या सेवानिवृत्त सैनिकांनी तरुण पिढीला प्रेरणा दिली.नागरिकांनी देखील मॅरेथॉन मध्ये सहभागी होऊन देशातील जनता सदैव सैन्यदलाच्या पाठीशी असल्याचा संदेश दिला.
साडेबारा किलोमीटर,सहा किलोमीटर आणि पाच किलोमीटर असे तीन गट करण्यात आले होते. तीनही गटातील पहिल्या दहा धावपटूंना पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.तीनही गटातील पहिल्या तीन विजेत्यांना रोख रक्कमेचे बक्षीस देण्यात आले.ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी सदर्न स्टार विजय रन यशस्वी केल्याबद्दल मॅरेथॉन मध्ये सहभागी झालेल्यांचे आभार मानले.