पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाय योजना म्हणून बेळगाव शहरातील शिवाजीनगर मध्ये जुन्या विहिरीचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. एप्रिल मे महिन्यात होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाय योजना विहिरीचे काम हाती घेण्यात आले आहे.
नगरसेवक शिवाजी मंडळ यांच्या माध्यमातून या कामाची सुरुवात झाली असून आज आमदार राजू सेठ यांच्या हस्ते शिवाजीनगर तिसरी गल्ली येथील महिला बालकल्याण खात्याच्या कार्यालया आवारात असलेल्या विहिरीचे पुनरुज्जीवन करण्यात आले.
यावेळी आमदार राजू शेठ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून विकास कामाचा शोभारंभ करण्यात आला विहिरीच्या पुनरुज जीवनासाठीचा निधी आमदार राजू सेठ यांनी आपल्या आमदार निधीतून उपलब्ध करून दिला आहे तसेच त्यासाठी प्रभाग क्रमांक 14 चे नगरसेवक शिवाजी मंडळ यांनी विशेष परिश्रम सुद्धा घेतले आहेत.
या शहरात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे त्यामुळे येणाऱ्या कार्यालयात नागरिकांना आणखीन पाणी टंचाई उद्भवू नये याकरिता नगरसेवकांनी पुढाकार घेत जनतेच्या समस्या सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी शिवाजीनगर भागातील नागरिक मोठ्या संख्येने भूमिपूजन समारंभ प्रसंगी उपस्थित होते