एक नोव्हेंबर काळा दिन गांभीर्याने पाळण्यासंदर्भात जनजागृती
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती, व युवा समितीच्या वतीने उद्याचा एक नोव्हेंबर काळा दिन तालुक्यातील संपूर्ण मराठी भाषिकांनी गांभीर्याने पळावा व आपापले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून झालेल्या अन्यायाविरोधात केंद्र शासनाचा निषेध जांबोटी गावातील व भागातील मराठी भाषिकाने गांभीर्याने करावा यासाठी जांबोटी येथे पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली आजूबाजूच्या परिसरातील बाजारानिमित आलेल्या मराठी भाषिकांनासुद्धा पत्रके वाटण्यात आली.
तसेच बुधवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी स्टेशन रोड खानापूर येथील लक्ष्मी मंदिर येथे सकाळी 11 ते 2 पर्यंत लाक्षणिक उपोषण व होणाऱ्या जाहीर सभेमध्ये बहुसंख्य मराठी भाषिकांनी भाग घेऊन केंद्र सरकारचा निषेध करावा यासाठी मोठी उपस्थिती जांबोटी भागामधून दिसावी असे सर्वांना आवाहन करण्यात आले यावेळी तालुका पंचायत चे माजी सभापती सुरेश राव देसाई व समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील रवी पाटील राजू पाटील कार्यकर्ते उपस्थित होते