सालाबाद प्रमाणे या वर्षी ही वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन पी यु सी व्दितीय आणि प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यासाठी करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्यां बेळगावची कन्या भारतीय सेना अधिकारी ॲडम ऑफिसर पंकजा कुगजी या लाभल्या,एस के ई सोसाइटीचे पदाधिकारी श्री ग्यानेश कलघटगी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले ,व्यासपीठावर प्राचार्य एस एन देसाई ,प्रा अनिल खाण्डेकर, प्रा विनय नाईक, विद्यार्थी प्रतिनिधी चैतन्य कारेकर,विद्यार्थीनी प्रतिनिधी डिंपल पुरोहित उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात कुमारी पावनी इरसंग या विद्यार्थ्यीनीच्या स्वागत गीताने झाली, उपस्थित पाहुणे, सोसाइटीचे पदाधिकारी, विद्यार्थी, पालक, प्राध्यापक यांचे स्वागत प्राचार्य एस एन देसाई यांनी केले,
वार्षिक अहवाल विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष प्रा अनिल खाण्डेकर यांनी प्रस्तुत केला.
प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष यांचा परिचय प्रा रेश्मा संपले यांनी सादर केला.
कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुण्या बेळगावची कन्या ॲडम ऑफिसर पंकजा कुगजी या भारतीय सेनेच्या तांत्रिकय शाखेत 2004 ला रूजू झाल्या,सध्या 25 कर्नाटक बटालियन बेळगाव,मध्ये ॲडम ऑफिसर पदी कार्यरत आहेत. विद्यार्थी वर्गाचे मार्गदर्शन करतेवेळी त्या म्हणाल्या विज्ञान ही फार जबाबदारीची शाखा आहे,आपन वेगवेगळी ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न शील अस्ता पण काही वेळा अपयश येते, अशावेळी स्वतःला खचू न देता, नवीन संधी शोधून यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावा.समाजामध्ये अनेक क्षेत्रांत आणि विभागात अपन अपल्या प्राविण्या प्रमाणे संधी प्राप्त करून यशाची झेप गाठू शकता जीवन अंत किंवा नैराश्य हा आपला ध्येय नसावा,प्रामणिकता आणि परिश्रम यांना यश प्राप्त होतेच असा उद्गार व्यक्त केला, त्यांनी सर्व विद्यार्थी वर्गास भावी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सालाबाद प्रमाणे या वर्षी ही काॅलेज आणि काॅलेज परिसराच्या बाहेर आयोजित संस्कृतीक,मैदानी खेळ, निबंध लेखन, गायन,योगा,जलतरण, नृत्य, प्रश्न मंजुषा, अशा अनेक स्पर्धेमध्ये, राज्यस्तरीय, अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, तालुका, जिल्हा स्तरीय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थी स्पर्धकांचा तसेच एन सी सी कॅडेट यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते,गौरव करण्यात आला. या वर्षाचा उत्कृष्ट विद्यार्थी कुमार स्वंयम खाण्डेकर, आणि उत्कृष्ट विद्यार्थीनी कुमारी रिध्दी पाटील यांची निवड करण्यात आली.
पारितोषिक वितरणाची धुरा प्रा. हरी राजगोळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रा जयश्री कनगुतकर, प्रा दत्तात्रय जोशी यांनी सांभाळली.
सूत्रसंचालन प्रा डाॅ किर्ती फडके, प्रा सोनिया चिठ्ठी, प्रा प्रज्ञा अंकलकोपे यांनी केले.
आभार प्रदर्शन प्रा अभिजीत गवस यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्र गीताद्वारे करण्यात आली.