बेळगांव:के एल एस संचलित श्री वसंतराव पोद्दार पॉलिटेक्निक कॉलेज बेळगाव मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन विभागातर्फे एक दिवशीय विविधचे कामांचे महत्त्व काय आहे. या विषयावर मान्यवराकडून मार्गदर्शन करण्यात आले.
प्राध्यापक संतोष कुलकर्णी यांनी आजच्या जगामध्ये AI (आर्टिफिशल इंटेलिजन्स) या विषयावर मार्गदर्शन करत AI कशा प्रकारे फायदेशीर आहे. त्याच्या तोट्या संदर्भात माहिती दिली. आपण AI चा योग्य वापर करुन कोणकोणती कामे करू शकतो. आपण याचा वापर करुन कमी वेळेत कामे पूर्ण करू शकतो.या विषयावर मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात बेळगाव मधील सर्वोकंट्रोल येथील इंजिनियर किशन भट्ट ,रघुनाथ शेट्टी,राजू पाटील यांनी चंद्रयान उपग्रहाचे सेंसर बनविण्यामध्ये कितपत योगदान आहे .तसेच तयार करायला कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे.यावर त्यानी उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले.तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या राष्ट्राला “टेक्निकल”क्षेत्रात कार्य करून देशाचे नाव उंचवावे असे श्री किशन यांनी विनंती केली.
याप्रसंगी डिपार्टमेंटचे कॉर्डिनेटर श्रीमती के.एस.भारती विभाग प्रमुख अमृता देवणगावी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.या कार्यक्रमाला प्राचार्य श्रीदेवी मलाज यांचे प्रोत्साहन लाभले.