This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*मुख्यमंत्र्यांचे जनतेच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगांव:मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आजपर्यंत ‘नयापैसे अनुदान’ जारी केलेले नाही.हिवाळा आणि पावसाळा न पडल्याने राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. असे भाजपचे प्रदेश प्रवक्ते अश्वस्थ नारायण यांनी वक्त्यव्य केलंय.

बेळगाव येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना भाजपचे प्रदेश प्रवक्ते अश्वस्थ नारायण म्हणाले की, हिवाळा आणि मान्सूनच्या जोडीने राज्यात भीषण दुष्काळ आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नुकतीच जनताला मुलाखत देताना जिल्हा प्रभारी मंत्री दौरे करत नसल्याची तक्रार केली होती. त्यांनी अनेक लोकांच्या समस्या सोडवल्याचं ते म्हणाले.

बीएस येडियुरप्पा मुख्यमंत्री झाले तेव्हा पूर आला होता.त्यावेळी ज्यांच्या घराची पडझड झाली त्यांना ५० हजार आणि ज्यांच्या पिकाचं नुकसान झालं त्यांना ५० हजारांची मदत दिली असे सांगितले

 

त्यानंतर ते म्हणाले राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे, बेळगाव अधिवेशनादरम्यान एका महिलेवर बेळगावात हल्ला झाला, काल कागवाडमध्ये हा प्रकार घडला, कलबुर्गी दोन खून काल झाले असे सांगितले .मुख्यमंत्री केंद्राच्या निती आयोगाच्या बैठकीला उपस्थित न राहता केंद्र सरकार विनाकारण अनुदान देत नसल्याचे नमूद केले आहे. जीएसटीच्या बैठकीला न जाता खोटं पसरवत असल्याचं ते म्हणाले.

यावेळी प्रदेश भाजप उपाध्यक्ष अनिल बेनके, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, महामंडळ सदस्य हनुमंत कोंगाळी उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now