बेळगावात बुधवारी सकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पावसाळा सदृश्य वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळ पासूनच आकाशात ढग दाटून आले होते.त्यामुळे सूर्यदर्शन झालेच नाही.प्रारंभी काही वेळ पावसाचे थेंब पडण्यास सुरुवात झाली.अर्ध्या तासाहून अधिक काळ पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली.त्यानंतर मात्र ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि आकाश अंधारून आले. लगेच पावसाला जोरदार सुरुवात झाली.दीड तासाहुन अधिक काळ अवकाळी पाऊस सुरू होता.
सकाळी शाळा ,कॉलेजला जायची वेळ असल्याने विद्यार्थ्यांची मात्र तारांबळ उडाली.जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साठल्याचे पाहायला मिळाले.सध्या भात पिकाची कापणी सुरू झाली आहे.भात कापून शेतात ठेवलेल्या भात पिकाचे नुकसान झाले आहे.अद्याप शेतात असलेल्या भातपिकाचे भात पावसामुळे झडून गेल्याने शेतकऱ्याला नुकसान सहन करावे लागणार आहे.