आज विधान सभेत झालेल्या चर्चेदरम्यान उत्तर आणि दक्षिण च्या आमदारांमध्ये तू तू मैं मै झाली या दोघांमधील तू तू मैं मैं चांगलीच रंगली असते मात्र सभापती यु टी खादर यांनी हस्तक्षेप करत त्यांच्यातील हा वाद मिटविला.
यावेळी विधानसभेमध्ये बोलताना आमदार अभय पाटील यांनी काँग्रेसवर टीका केली ते म्हणाले की काँग्रेसने 50 वर्षात बेळगावचा विकास केला नाही संभाजी पाटील महापूर असताना बेळगाव महानगरपालिकेने काँग्रेस सरकारकडे 50 लाखांचे कर्ज विकासाकरिता मागितले होते मात्र काँग्रेसने ते दिले नाही असा आरोप केला यावेळी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उत्तरचे आमदार सेट आणि दक्षिणचे आमदारांमध्ये चांगलीच रंगत वाढली.
वेळी आमदारांनी बेळगावचे विकासासाठी पूर्वीच्या काँग्रेस सरकारने एक रुपया देखील दिला नसल्याचा टोला लगावीला. आणि ते म्हणाले की बेळगावचा विकास खऱ्या अर्थाने कुमारस्वामी आणि येडूरप्पा यांच्या काळात झाला आहे काँग्रेसने बेळगावच्या विकासामध्ये एक रुपया देखील दिला नाही.
तसेच या चर्चेदरम्यान बेळगाव उत्तरचे आमदार राजू शेठ यांनी बेळगाव विमानतळावर दिवस-रात्र विमान उतरण्याची सोय आहे येथून विमान उड्डाणे मोठ्या प्रमाणात होत होती प्रवाशांचा त्याला प्रतिसाद दिला होता तरीही ती हुबळी विमानतळावर का नेण्यात आली असा सवाल उपस्थित केला यावेळी या चर्चेदरम्यान दोघांमध्ये तू तू मैं मैं झाली खेड सभापती यु टी खादरी यांना हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांच्यातील वाद मिटला