कर्नाटकामध्ये जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने जनतेला भरडून काढायचे ठरविले आहे की काय असे वाटत आहे, सर्व आघाड्यावर काँग्रेस सरकार विफल झालेले आहे, सांबरा येथील विद्यार्थ्यांची अनेक दिवसांपासून बसव्यवस्था सुरळीत करावी यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न सुरू आहेत पण बसची काही व्यवस्था होत नाही शेवटी कंटाळून सांबरा गावातील विद्यार्थी व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सांबरा येथे रास्ता रोको करून सुरळीत बस व्यवस्थेची मागणी केली, याप्रसंगी बोलताना भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री धनंजय जाधव म्हणाले काँग्रेस सरकार सत्तेवर येताच जनउपयोगी 19 योजना बंद केलेल्या आहेत राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणारे रू. 4000 बंद केलेले आहेत शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मिळणारी मदत निधी बंद केलेले आहेत, विद्युतच्या अभावामुळे लोड शेडिंग सुरू आहे, महिलांना रुपये 2000 रुपये देण्याची आश्वासन देऊन महिलांची फसवणूक केली आहे, तरुणांना खोटी आश्वासने दिली होती त्याचा सुद्धा बोरबारा उडाला आहे, मोफत बस प्रवासाची योजना जनतेला डोकेदुखी झाली असून विद्यार्थी सकाळी 9 वाजता बस स्टॉप कडे जाऊन थांबतात पण बस वेळेत न मिळाल्यामुळे शाळेला वेळेत जाऊन पोहोचत नाहीत, 5 वाजता शाळा सुटते पण बस मिळत नसल्यामुळे रात्री 8 ते 9 वाजता घरी यायची वेळ विद्यार्थ्यांच्या वर आली आहे, अभ्यासाची तसेच परीक्षेची तयारी करायच सोडून बससाठी आंदोलन करण्याची वेळ विद्यार्थ्यावर आली आहे, यामुळे विद्यार्थ्यांच्या अतोनात हाल होत आहेत तेव्हा रोज चार बस सांबरा येथे सोडावीत अशी त्यांनी मागणी केली, यावेळी कु. स्वाती जुई, सोनाली चौगुले, तुषार नागन्नावर विद्यार्थ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.
या आंदोलनाला विक्रम सोनजी, मल्लाप्पा कांबळे, सांब्रा ग्राम पंचायत अध्यक्ष श्रीमती रचना गावडे, उपाध्यक्ष मारुती जोगणी, ग्राम पंचायत सदस्य पुंडलिक जत्राटी, अविनाश परीट, धरमेंद्र तळवार, कल्लाप्पा पालकर, विलास खनंगावकर, मनोहर जुई, राहुल गावडे, शशी कोकितकर, प्रभात यद्दी, शांता देसाई, श्वेता बामनवाडी, सपना तळवार, लक्ष्मी देसाई, कल्लवा करेगार तसेच शेकडो विद्यार्थी, ग्रामस्थ व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.🚩🚩