सीमा प्रश्नी एक वर्षांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्राचे दोन्ही मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक घडवून आणली होती. या बैठकीमध्ये या दोन्ही राज्यातील समन्वयांच्या सोडवणूक करा आणि दर महिन्याला बैठक घ्या अशा सूचना देखील केंद्राने दोन्ही राज्यांना केल्या होत्या मात्र केंद्र सरकारच्या या सूचनेकडे कानाडोळा केला असल्याने केंद्रीय गृहमंत्र्यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्राला यासंबंधी नोटीस बजावून कान पिचक्या केल्या आहेत.
14 डिसेंबर 2022 रोजी दिल्ली येथे समन्वय समितीची बैठक झाली होती त्यानंतर कोणतीही बैठक घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आता केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारला नोटीस बजाविली आहे