खानापूर तालुक्यातील बेकवाड आणि नंदगड परिसरातील शेतवाडीत हत्तीचा मुक्त संचार सुरू असल्याने शेतकरी आणि जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे.
खानापूर तालुक्यातील वन खात्याचे
अधिकारी हत्तीला पुन्हा जंगलात पाठवण्यासाठी सज्ज झाले आहेत.शुक्रवारी रात्री बेकवाड भागात हत्तीचे आगमन झाले आणि रात्रभर हत्तीने शेतातील उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.हत्ती आल्याचे वृत्त लोकांना कळताच लोक मोठ्या संख्येने हत्ती पाहण्यास आणि फोटो काढण्यास जमले होते.वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी हत्ती जवळ जावू नका असे सांगून देखील काही अतिउत्साही to मंडळी हत्तीचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास नसते धाडस करत होते.
अखेर पोलिसांनी या अतिउत्साही लोकांना पांगवले.एक महिन्या पूर्वीच खानापूर तालुक्यात हत्ती दाखल झाला होता.त्यावेळी वन खाते त्याला जंगलात पाठवण्यात यशस्वी झाले होते.आता पुन्हा हत्तीचे खानापूर तालुक्यात आगमन झाल्या मुळे पुन्हा शेतातील पिकांचे नुकसान होणार काय अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात बसली आहे.