रोजगार हमी योजना शेतीमध्ये राबविण्याकरिता शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे रोजगार हमी योजना शेतकऱ्यांकरिता उपयोगी करा अशी मागणी केली.
यावेळी शेतकरी म्हणाले की शेतीमध्ये काम करण्यासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार मिळावा यासाठी राज्य सरकारकडून रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहे यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे शेतीसाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे त्यामुळे सरकारने रोजगार हमी योजना शेतीमध्ये राबविण्यात यावी अशी मागणी यावेळी केली.
रोजगार हमी योजने अंतर्गत एकच काम दरवर्षी केले जात आहे यामुळे सरकारचा निधी वाया जात असून रोजगार हमी योजना शेतकऱ्यांना उपयोगी पडेल अशी राबविण्यात यावी शेतीतील कामासाठी मजूरही मिळतील त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सोयीचे ठरेल अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.