कुकडोळी येथील चन्नमल्लय्या मठाचा आवारामध्ये पेव्हर्स बाक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. सदर काम हे राज्यसभा सदस्य कर्नाटक राज्य रयत मोर्चा अध्यक्ष इरांण्णा कडाडी यांच्या अनुदानातून साकारण्यात येत आहे.
या कामाचा भूमिपूजन समारंभ इराणा कडाडी यांच्या हस्ते करण्यात आला.सदर मठाच्या सुशोभीकरणाकरिता पाच लाख रुपये मंजूर करण्यात आले असून यावेळी मठ नव्याने सुशोभीत होत असल्याचे पाहून अनेकांनी गौरवरोदगार काढले.
याप्रसंगी कृषी खाते फलोत्पादन खाते व पशु संगोपन या तिन्ही खात्याचे अधिकारी भूमीपूजनाच्या कार्यक्रमाकरिता उपस्थित होते.
यावेळी बोलताना इराण्णा कडाडी म्हणाले की शेतकरी हा देशाचा कणा आहे शेतकरी शेतामध्ये जे अन्नधान्य पिकवतात त्यावरूनच संपूर्ण जग चालत आहे जर आपल्याला काही खायचे असेल तर शेतकऱ्यांनी पिकवल्यावरच आपण खाऊ शकतो.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेती करिता अनेक योजना राबवत आहेत याच्या माध्यमातून आपला देश आर्थिक बाबतीत मजबूत झाला आहे. त्यामुळे बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील कुकडोळी गावामध्ये सदर काम करत असताना आनंद होत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
त्यानंतर उपस्थितानी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी या भूमीपूजन कार्यक्रमाकरीता कृषी खात्याचे तालुका अधिकारी सी एस नायकर पशुपालन खात्याचे अधिकारी आनंद पाटील फलोत्पादन खात्याचे अधिकारी रवींद्र महेंद्रकर भाजप बेळगाव ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य याबरोबर कुकडोळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.