काँग्रेस सरकार विरोधात भाजपचे 13 रोजी भव्य आंदोलन
बीएस येडूरप्पा मार्गावर येत्या दोन दिवसांमध्ये म्हणजेच 13 डिसेंबर रोजी सरकारच्या विरोधात विशाल महाधिवेशन घेण्यात येणार असल्याची माहिती आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विधान परिषद सदस्य एन रविकुमार यांनी दिली.
यावेळी ते म्हणाले की राज्य सरकारच्या अपयशाचा निषेध करण्याकरिता आपण सर्वजण एकत्र येणार आहोत यामध्ये 25 हजार भाजप कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
त्यामुळे येत्या 13 डिसेंबर रोजी काँग्रेस सरकारच्या विरोधात भाजप तर्फे मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी पुढे ते म्हणाले की 125 वर्षात मोठा दुष्काळ पडला पडला नाही मात्र आता 125 जणांना ही भरपाई मिळाली नाही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना देखील अजून पर्यंत भरपाई मिळाली नाही अशा स्थितीत अल्पसंख्यांकांच्या हिताकरिता दहा हजार कोटी निधीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली ही अपरोधक गोष्ट असल्याचे ते म्हणाले
त्यानंतर बोलताना भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील म्हणाले की काय जनतेची फसवणूक करत आहे जनतेची फसवणूक करून सध्या काँग्रेस सत्तेत आले आहे. तसेच किसान सन्मान योजना रद्द करून त्या निधीचा गैरवापर काँग्रेस सरकार करत आहे. किसानांचे पैसे घरोघरी महिलांना देण्यात येत आहे म्हणजेच त्यांचे पैसे त्यांच्याच खिशात असे काँग्रेस सरकार करत असल्याचा आरोप यावेळी संजय पाटील यांनी केला.
यावेळी या पत्रकार परिषदे करिता भाजप महानगर जिल्हाध्यक्ष अनिल बेनके ,प्रदेश भाजप प्रवक्ते एम बी जिरली, भाजप नेते रवी पाटील ,संजय पाटील विधान परिषद सदस्य रवी कुमार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.