आज मंगळवारी सकाळी आसिफ (राजू) सेठ यांच्या हस्ते वीरभद्र नगर परिसरातील गटर बांधकामाचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला .
ऐन पावसाळ्यात या भागाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते .ही समस्या मागील आमदाराच्या कार्यकाळात देखील कायम होती , मात्र त्या सोडविण्यासाठी कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबल्याने या भागाला अडचणींचा सामना करावा लागत आहे .त्यामुळे वैयक्तिक तसेच सार्वजनिक सुविधांचे नुकसान देखील झाले आहे .
त्यामुळे ही समस्या जाणून घेऊन बांधकामाला सुरुवात करण्यात आली .यावेळी आमदारांनी रहिवाशांशी बोलतांना असे म्हणाले की, पुढील वर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी या भागातील प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, आणि भविष्यात पूर येऊ नये म्हणून मोठी पावले उचलली जातील असे सांगितले.यावेळी रहिवाशांनी आमदारांचे आभार मानले आणि विकास कामांच्या प्रकल्पाला सुरुवात केल्या बद्दल आनंद व्यक्त केला.