बेळगाव मधून बंद झालेली बेळगाव ते पंढरपूर पॅसेंजर रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी आज बेळगाव तालुक्याच्या वतीने श्रीराम मंदिर ट्रस्ट निलजी आणि निलजी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे राज्यसभा सदस्य इराणा कराड यांच्याकडे केली.
पंढरपूरला जाण्याकरिता शहर तसेच तालुक्यातील वारकरी मंडळींची गैरसोय होत आहे त्यामुळे बेळगाव ते पंढरपूर पॅसेंजर रेल्वे सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी वकील लक्ष्मण यल्लाप्पा पाटील यांचे नेतृत्वाखाली सदर निवेदन इराणा कडाडी यांना जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले. यावेळी ते म्हणाले की कोरोनाचा काळा संपल्यानंतर सर्व रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आल्या मात्र बेळगाव ते पंढरपूर सेवा अजूनही सुरू करण्यात आली नाही त्यामुळे जे पंढरपूर ला जाणारे शहरातील भक्त आहे त्यांची गैरसोय होत आहे विशेष करून वयस्कर मंडळींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे पंढरपूरला जाण्याकरिता लवकरात लवकर रेल्वे सेवा सुरू करावी अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी निलजी येथील श्रीराम मंदिर चे सर्व सदस्य आणि निलजी गावातील नागरिक उपस्थित होते.