खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी लक्ष्मी यात्रेपूर्वी गोदगिरी गावातील प्राथमिक सोयी सुविधा तसेच रस्ता पाणी गटार या सर्व सुविधा शासन दरबारी मांडून गावचा विकास करणार असल्याची माहिती बोलताना दिली आहे.
28 मार्च रोजी खानापूर तालुका मध्ये झालेल्या बैठकीत गोदगिरी गावामध्ये आमदार विठ्ठल हलगेकर यांनी प्रतिपादन केले आणि म्हणाले की गावचा विकास माझा विकास आहे त्यामुळे सर्वत्रपरी मी गावच्या विकासाकरिता प्रयत्न करणार आहे.
पुढच्या वर्षी गोदगिरी येथील लक्ष्मी यात्रा होणार आहे त्या अनुषंगाने यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता प्रयत्न करणार आहे. तसेच गावामध्ये शासकीय अनुदान आणता येईल याकरिता मी माझी संपूर्ण ताकद लावणार असल्याची माहिती यावेळी बैठकीत दिली.
तसेच भक्तांची गैरसोय होऊ नये याकरिता योग्य नियोजन राबविण्यात बाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी बैठकीला गोधोळी येथील ज्येष्ठ नागरिक मनोहर कदम, ज्योतिबा लोहार,विष्णू जांबोटकर,मनोहर मंचारकर, प्रसाद गाडगीळ,रामचंद्र निलस्कर,भालचंद्र बेळगावकर, यांच्यासह गावातील पंचमंडळी आणि गोदगिरी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.