बेळगाव किल्ला तलावाचा कायापालट होण्याची स्थितीत आहे, पर्यटकांन आकर्षित करण्यासाठी नवीन गोष्टी आणि नवीन क्रीडा उपक्रम तलावात राबविण्यात येत आहेत.
उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ , लघु पाटबंधारे मंत्री एन एस बोसेराजू यांच्यासह, इतर अधिकाऱ्यांसह तलाव परिसराला भेट देऊन चालू विकासाची पाहणी केली आणि भविष्यातील प्रकल्प विकासाबाबत चर्चा केली.
किल्ला तलाव हा बेळगावकरांचा लाभलेला वारसा असून, शहरातील पाणवठ्यांचे जतन व देखभाल करणे महत्त्वाचे आहे. लोकांना जलक्रीडाद्वारे पुरविल्या जाणाऱ्या सुविधांचा आनंद घेण्यासाठी आकर्षित करणे हे एक मोठे पाऊल आहे, असे सेठ बोलताना म्हणाले.