संविधान रक्षणार्थ दलित बांधव मोठ्या संख्येने दलित संमेलनाला उपस्थित
बेळगांव:कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकर वाद च्या वतीने संविधानाच्या रक्षणाकरिता आणि लोकशाही टिकविण्याकरिता जिल्हास्तरीय दलित संमेलन आयोजित करण्यात आले होते . यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत संविधानाच्या आरक्षणाकरिता जागृती फेरी काढण्यात आली.
आंबेडकर मार्ग चन्नमा सर्कल जिल्हाधिकारी कार्यालय मार्ग सर्कल ओल्ड पीबी रोड शरमन शाळा येथून गंधर्व रंगमंदिर येथे जिल्हासस्तरीय दलित संमेलन पार पडले.
संविधान टिकवण्याचा नारा देत बेळगाव शहरांमध्ये दलित संघर्ष समितीच्या सदस्यांनी जागृती रॅली काढली. त्यानंतर संमेलनामध्ये सहभाग घेतला. यावेळी डॉ बाबासाहेबांचे विचार आणि आचार प्रत्येकाने आपल्या अंगीकारले पाहिजे, संविधानाच्या रक्षणाकरिता आपण सर्वत्र एकत्रित आले पाहिजे अशी प्रतिज्ञा केली.
प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उत्तरचे आमदार असिफ राजू सेठ, केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, प्राध्यापक के.डी.मंत्रेशी, एडवोकेट आनंद संद्रिमनी, कर्नाटक संघर्ष समिती आंबेडकर वाद राज्य संघटना संचालक सिद्दप्पा कांबळे,दलित समाजाचे नेते मल्लेश चौगुले, राज्य प्रधान संचालक मावळी शंकर , सुरेश तलवार, संतोष भीम पुत्र यांच्यसह दलित समाजाचे नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आ राजू शेठ म्हणाले की संविधान वाचविण्याकरिता प्रत्येक जाती-धर्मातील नागरिकांचे कर्तव्य आहे. हे काम सर्वांनी मिळून करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
प्रास्ताविक भाषण मल्लेश चौगुले यांनी केले. स्वागत भाषण जिल्हा संचालक महंतेश तलवार तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार कराप्पा गुंड्डेनावर यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरिता महादेव तलवार,रामा चव्हाण, दीपक धबाडे ,सुधीर चौगुले, शिवपुत्र मैत्री ,विनोद सोलापुरे,आनंद कोलकार,अनिल कांबळे, एम आर खातेदार,सागर कोलकर, कल्लाप्पा चव्हाण, रामानंद मैत्री, आनंद कांबळे, संतोष तलवार, बसवराज नाईक,कस्तुरी कोलकर, शानुर कंग्राळकर, जीवन कुरणे, उदय मैत्री, राम मदार, शिवाजी मदार, अशोक कांबळे, संतोष हलगेकर, एन सी तलवार यांच्यासह दलित महिला व दलित संघर्ष समिती आंबेडकर वादचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा दलित मेळावा यशस्वी करण्यासाठी दलित नेते मल्लेश चौगुले तसेच सिद्धाप्पा कांबळे यांचे मोठे योगदान लाभले.