अश्विन- जडेजाने भारताचा डाव सावरला
भारत-बांगलादेश पहिली कसोटी
चेन्नई:
चेन्नई येथील एम चिदंबरम स्टेडियमवर गुरुवारपासून भारत विरुद्ध बांगलादेश यांच्या दरम्यान पहिली कसोटी सुरू झाली आहे. बांगलादेशने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पण भारताची सुरुवात खूपच खराब झाली. एकवेळ तर भारताची 10 षटकात तीन बाद 34 धावा अशी अवस्था होती. त्यानंतर प्रथम यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंत यांनी आणि त्यानंतर आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी भारताची स्थिती भक्कम केली. आर अश्विन आपले शतक पूर्ण करून 102 धावांवर नाबाद राहिला तर रवींद्र जडेजा दिवसअखेर 86 धावांवर नाबाद राहिला आहे.
जयस्वालने रचला इतिहास
भारताच्या यशस्वी जयस्वालने एक नवा इतिहास रचला आहे. भारताचा डाव सावरताना एक विशेष पराक्रम केला. त्याने डब्ल्यूटीसी 2023 -25 मध्ये सर्वात अधिक चौकार मारण्याचा फलंदाज बनण्याचा पराक्रम केला. खेळाच्या पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात विराट कोहली, रोहित शर्मा, गिल स्वस्तात बाद झाले. मात्र त्यानंतर ऋषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल यांनी भारतीय डावाला आकार दिला. दुसऱ्या सत्रामध्ये ऋषभ पंत, यशस्वी जयस्वाल, के एल राहुल हे बाद झाले. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय टीम बिकट स्थितीत आली. त्यानंतर मात्र आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांची चांगली धुलाई केली. दिवस अखेर रवींद्र जडेजा 86 रणांवरना नाबाद तर अश्विन 102 धावावर नाबाद होता. आर अश्विन याने चेन्नईमध्ये दुसऱ्या वेळी कसोटी शतक केले. बांगलादेशकडून हसन महमूद याने चार विकेट घेतल्या तर नाहीद राणा आणि मेहदी हसन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
अश्विन – जडेजा यांचा विक्रम
अश्विन याने चौथ्यांदा कसोटीत शतक केले आहे. अश्विन आणि जडेजा यांनी कसोटीत क्रिकेटच्या पहिल्या दिवशी सातव्या किंवा त्याखालच्या
विकेटसाठी 195 धावांची भागीदारी करून सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम केला.
D Media 24 > Sports > *अश्विन- जडेजाने भारताचा डाव सावरला* भारत-बांगलादेश पहिली कसोटी
*अश्विन- जडेजाने भारताचा डाव सावरला* भारत-बांगलादेश पहिली कसोटी
Deepak Sutar19/09/2024
posted on
Leave a reply