भारतीय जनता पक्ष आणि आणि शेतकरी रयत संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या हिताकरिता आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून भाजप कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी आंदोलन केले तसेच आपल्या मागण्यांची पूर्तता व्हावी अशी मागणी केली.
चन्नम्मा सर्कल येथून आंदोलनाला सुरुवात झाली त्यानंतर आंदोलन करत सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पोहोचले यावेळी पोलीस आणि यामध्ये झटापट झाली.
यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट उपटून आत शिरण्याचा प्रयन्त केला. मात्र पोलिसांनी त्यांना बाहेर अडविले. यामुळे ठेवणारे की काँग्रेस सरकार सत्तेत येऊन सहा महिने झाले आहे मात्र या सहा महिन्यांमध्ये शेतकऱ्यांवर काँग्रेसने अन्याय केला आहे.
काँग्रेसच्या दहा योजना फोल ठरल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हिताकरिता काँग्रेसने विद्युत पुरवठा पंपसेट सात तास सातत्याने ठेवणे गरजेचे आहे. मात्र आता सिद्धरामय्या सरकारने ते पाच तास केले आहे. यामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी केली.
याप्रसंगी खासदार मंगला अंगडी,माजी आमदार अनिल बेनके संजय पाटील महांतेश कवटगीमठ एम बी जिरली, भाजपचे नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी बांधव उपस्थित होते.