मुसळधार पावसामुळे शाळेला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून पाण्यातून जावे लागत आहे.पाण्यातून जीव धोक्यात घालून विद्यार्थी जात असलेले पाहिले की हृदयाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही.
बेळगाव जिल्ह्यातील कित्तुर तालुक्यातील निंगापुर गावातील विद्यार्थ्यांना शाळेत पोचण्यासाठी किती धोका पत्करावा लागतो हे दाखवणारे हे दृश्य आहे.ट्यूब मध्ये हवा भरून त्यात बसून विद्यार्थ्यांना ओढा पार करावा लागतो. ट्युबमध्ये बसून ओढा पार करणे धोकादायक असून जोराचा वारा आला तर ट्यूब मधून जात असलेल्या विद्यार्थ्याना जलसमाधी मिळू शकते.
ट्युबला दोरा बांधून पालक मुलांना ओढा पार करण्यास मदत करतात.गेल्या वीस वर्षांपासून या ओढ्यावर पूल बांधावा अशी मागणी करण्यात येत आहे.पण अद्याप पूल बांधण्यात आला नाही.त्यामुळे दरवर्षी शाळेला जाणाऱ्या मुलांना जीव धोक्यात घालून ओढा पार करावा लागतो.