अनंतपुरा गावा मध्ये रस्ता नसल्याने सर्व नागरिकांचे हाल होत आहेत . विशेष करून या गावांमध्ये विद्यार्थी आणि शेतकरी असल्याने दैनंदिन कामाकरिता त्यांना मोठे त्रास सहन करावा लागत आहेत याआधी येथील रस्ता करून देण्याकरिता गावकऱ्यांनी निवेदन दिले होते मात्र या समस्यांकडे दुर्लक्ष करणे असल्याने अनंतपुरा गावकऱ्यांनी पुन्हा एकदा निवेदन दिले आहे.
अथणी तालुक्यातील अनंतपुरा गावातील रजिस्टर क्रमांक 237 238 229 अंतर्गत जमिनी आहेत. या जमिनीतून रस्ता करण्याची मागणी येथील गावकऱ्यांनी केली आहे. गावातून ये जा करण्याकरिता गावामध्ये रस्ता नसल्याने सर्व नागरिकांचे हाल होत आहेत.
तसेच या ठिकाणी रस्ता नसल्याने एका खड्ड्यामधून नागरिकांना दुसऱ्या बाजूला जावे लागत आहे. दोन बँकांच्या मालकांनी अतिक्रमण केला आहे त्यामुळे येथील नागरिकांना रस्ता नसल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच महाराष्ट्रातून चंद्रपानवाडीला पाणी सोडण्यात आल्याने येथील खड्डा भरला आहे त्यामुळे रस्ता बंद झाल्याने शाळकरी मुलांना शाळेत जाणे व गावकऱ्यांना दैनंदिन व्यवहार करणे अवघड बनले आहे. याचबरोबर कारखाना ऊस निर्यातकराना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनंतपुरा गावातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे गावामध्ये लवकरात लवकर रस्ता करून द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.