बेळगांव: कंग्राळी बुद्रुक येथे जलजीवन मिश्रांतर्गत गावामध्ये विहीर मंजूर झाली. असून याकरिता ८ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. याकरिता पवार कुटुंबीयांनी आपल्या मालकीची जागा गावातील विहिरी करिता दिली आहे. विहिरीचे भूमिपूजन शुक्रवार दिनांक ८/०३/२०२४ रोजी करण्यात आले. व विहिरीच्या खुदाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
ज्योतिबा पवार आणि नूतन पवार यांनी गणपती रामू पवार यांच्या स्मरणार्थ गावकऱ्यांकरिता विहिरीच्या पाण्याची सोय केली आहे. यावेळी गावकऱ्यांनी त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली . कंग्राळी बुद्रुक गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी या उद्देशाने पवार कुटुंबीयांनी आपले मोठे मन करून ही जागा दिल्याने त्यांचे आभार मानले आहेत.
ग्रामपंचायतच्या वतीने शांता गणपत पाटील व प्रशांत पवार,ज्योतिबा पवार ,लक्ष्मी पवार ,नूतन पवार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष दीपा पवार, सदस्य जयराम पाटील ,अनिल पावशे,दत्ता पाटील ,उमेश पाटील ,दादासाहेब भदर्गडे, यांच्यासह ग्रामविकास अधिकारी यावेळी विहिरीच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित होते.