https://youtube.com/shorts/dxZo4LhYLRE?si=G2tatIxRqMPnbWi1
जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेच्या आणि केबलच्या तारा तुटल्याने वीज आणि इंटरनेट सेवेत व्यत्यय आला. वारा जोरदार असल्याने झाडें गदागदा हलत होती. वाऱ्याचा जोर आणि पावसाचा जोर यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले. बरोबर शाळा आणि कॉलेज सुटली आणि पाऊस आल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. लग्नसराई असल्याने खरेदीसाठी बाजारात आलेल्याना देखील आसरा शोधावा लागला. अवकाळी पावसामुळे भाजीपाला, मोहरी, मसूर आणि कडधान्य पिकाचे मोठे नुकसान झाले.
Also read









