आपल्या भेटीदरम्यान आमदार शेठ यांनी सागर कॉलनीत फेरफटका मारत रहिवाशांशी थेट संवाद साधला. नागरिकांनी प्रलंबित असलेल्या विविध नागरी समस्यांबाबत मांडलेले प्रश्न त्यांनी ऐकून घेतले. यावेळी आमदारांनी सर्व तक्रारींचे योग्य तोडगे लवकरात लवकर काढले जातील, तसेच गटार प्रकल्प ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याची खात्री दिली.
स्थानिक रहिवाशांनी आमदारांच्या थेट संवादाची प्रशंसा करत, “या योजनेमुळे दीर्घकालीन दिलासा मिळणार असून, पावसाळ्यातील गटार व स्वच्छता समस्यांपासून मुक्तता होईल,” अशी अपेक्षा व्यक्त केली.
Also read









