आमदार पाटील यांच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, एका प्रभावशाली मंत्र्यांच्या पाठबळामुळे गोकुळ दूध संघात अनियमितता घडल्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासोबतच, संघाच्या कारभारावर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने प्रशासक नेमण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात ते लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
दरम्यान, तत्कालीन विभागीय उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी सुमारे 3700 नवीन दूध संस्थांच्या नोंदणीला मंजुरी दिल्याचा मुद्दाही आमदार पाटील यांनी उपस्थित केला आहे. या मंजुरीसह इतर व्यवहारांचीही चौकशी ईडीमार्फत व्हावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
या घडामोडींमुळे गोकुळ दूध संघाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Also read









