Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगावच्या विकासाला ब्रेक? निधीवरून आमदार अभय पाटील आक्रमक*

राज्य सरकारने गेल्या जवळपास तीन वर्षांत बेळगाव शहराच्या विकासासाठी एक रुपयाचाही विशेष निधी उपलब्ध करून दिलेला नसल्याचा गंभीर आरोप बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी केला. निधीअभावी शहरातील अनेक विकासकामे रखडली असून, याचा थेट परिणाम नागरिकांवर होत असल्याचा दावा त्यांनी केला.

मंगळवारी महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार पाटील म्हणाले की, २००८ पासून ते मागील सिद्धरामय्या सरकारच्या कार्यकाळापर्यंत बेळगाव शहरासाठी दरवर्षी सुमारे १०० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला जात होता. मात्र, विद्यमान सरकार सत्तेवर आल्यानंतर तीन वर्षे उलटूनही शहरासाठी विशेष निधी मंजूर करण्यात आलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांनी पुढे सांगितले की, निधीअभावी त्यांच्या मतदारसंघातील सुमारे २०० हून अधिक मंदिरे आणि समुदाय भवनांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी इमारतींचे बांधकाम अपूर्ण असून काही ठिकाणी दरवाजे, खिडक्या आणि इतर अंतिम कामे रखडल्याने या इमारती नागरिकांच्या वापरासाठी खुल्या करता आलेल्या नाहीत.

शहरातील रस्त्यांचीही मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याचा दावा करत त्यांनी खड्डे बुजविणे आणि रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले.

राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती चिंताजनक असल्याचा आरोप करत विकासकामांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही त्यांनी केली. बेळगावसह राज्यातील रखडलेल्या विकासकामांचा प्रश्न आगामी पावसाळी अधिवेशनात ठामपणे उपस्थित करून सरकारकडे जाब विचारणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेळगावच्या विकासाला ब्रेक? निधीवरून आमदार अभय पाटील आक्रमक*लोकांमध्ये मिसळून विकासाचा ध्यास; अभय पाटील यांची अनोखी कार्यशैलीविद्याभारती जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा.दोन वर्षांपासून बंद असलेला टेकाकडील चव्हाटा मंदिर शेतवडीचा रस्ता अखेर खुला*सरकारी मराठी शाळेस कायमस्वरूपी मुख्याध्यापक* देण्याची SDMC ची मागणी*फतेह कॉलनीतील वीज समस्या संपणार; आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण**विद्यार्थ्यांना AI आणि कोडिंगची मोफत पुस्तके; डिजिटल शिक्षणाला नवी दिशा**बेळगावात अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा एल्गार; मानधनवाढीसह प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या**बेळगावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीला प्रारंभ**विद्याभारती जिल्हास्तरीय स्पर्धा खो-खो स्पर्धेत शांतिनिकेतन देवेंद्र जीनगौडा संत मीरा गणेशपुर अंतिम फेरीत*