धर्मस्थळ प्रकरणावरून प्रमोद मुतालिक आक्रमक;
बेळगाव : धर्मस्थळ क्षेत्र आणि हिंदू श्रद्धांबाबत जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी काही वक्तव्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुतालिक यांनी धर्मस्थळ प्रकरणातील एसआयटीशी संबंधित घडामोडींचा संदर्भ देत अभिनेते प्रकाश राज यांच्यावर टीका केली.
धार्मिक विषयांमध्ये हस्तक्षेप करून समाजाच्या भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप करत, चित्रपट क्षेत्राने प्रकाश राज यांच्या भूमिकेचा निषेध करावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी त्यांनी जानवे काढण्याच्या घटनेचाही उल्लेख केला. अशा कृतींमुळे श्रद्धा आणि परंपरांचा अवमान होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच हरिहर येथील एका कार्यक्रमात प्रभू श्रीरामांबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत प्राध्यापक भगवान यांच्यावरही मुतालिक यांनी निशाणा साधला. संबंधित वक्तव्यांवर सरकारने कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या पत्रकार परिषदेला राजू पवार, शिवराज अंबारी यांच्यासह श्रीराम सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
