This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

February 2025
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*किल्ला तलावात सध्या पाहण्यासारखे आहे तरी काय?*

*किल्ला तलावात सध्या पाहण्यासारखे आहे तरी काय?*
D Media 24

किल्ला तलावात सध्या पाहण्यासारखे आहे तरी काय?

 

बेळगाव शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा म्हणजे भुईकोट किल्ला व त्यासमोरील किल्ला तलाव. मात्र सध्या हा किल्ला तलाव समस्यांच्या विळख्यात सापडलेला दिसतोय. आधी किल्ला तलावात असणारे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी नागरिक दररोज संध्याकाळी या ठिकाणी फेरफटका मारावयास येत असत. मात्र काळानुरूप यात सुधारणा होण्याऐवजी या किल्ला तलावाची दुरावस्था अधिक झालेली पहावयास मिळते.

 सध्या नागरिकांच्या सोयीसाठी या ठिकाणी, पाण्याची व्यवस्था, आसन व्यवस्था, पथदीप, शौचालयची व्यवस्था यासह अनेक गोष्टींचा अभाव आहे.

2007 मध्ये किल्ला तलाव परिसर विकास करण्याचा प्रकल्प दर्शन उद्योग समूहाच्या वतीने हाती घेण्यात आला. यावेळी काही वर्षे किल्ला तलावाच्या सभोवती नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. जसे की खाण्याचे स्टॉल, लहान मुलांना खेळण्यासाठी झोपाळे, डान्सिंग बॅग, रेल्वेची सफर यासह अनेक खेळाचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे नागरिक सायंकाळच्या वेळी या ठिकाणी गर्दी करत होते . यामुळे तलावाच्या परिसरात असणाऱ्या दुकानातुन, स्टॉल्स मधून महानगरपालिकेला दर महिन्याला चांगले उत्पन्न मिळत होते. आणि आता ही काही प्रमाणात का होईना ते ही मिळते.

तलाव परिसरात विविध सुविधा, मनोरंजनात्मक साहित्य, खेळाचे साहित्य उपलब्ध करून देण्याचे काम तलाव सुधारणा प्राधिकार मंडळाला कडे दिले आहे. मात्र या नयनरम्य परिसराकडे आणि त्याच्या देखभालीकडे जिल्हा प्रशासन आणि तलाव सुधारणा प्राधिकार मंडळाने साफ दुर्लक्ष केल्यामुळे येथील खेळाचे साहित्य, रेल्वे गाडी, दुकाने धूळ खात पडली आहे.

तसेच या ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत 7 लाख रुपये खर्च करून ई टॉयलेट्स सुविधा करण्यात आली आहे. मात्र हे ई टॉयलेट सध्या बंद अवस्थेत असलेले पाहायला मिळत आहे. याबरोबरच 2018 मध्ये या ठिकाणी 60 डेकोरेटिव्ह लॅम्प बसविण्यात आले होते. पण सध्या ते बंद अवस्थेत असून यातील फक्त दहा लॅम्प चालू स्थितीत आहे.

तसेच गेल्या दोन वर्षांपूर्वी तलावात एक कोटी रूपये खर्च करून या ठिकाणी मॅजिक फाऊंटनचा प्रकल्प निर्माण केला होता. तो आठवड्यातून दोनदा नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध होता. मात्र गेल्या वर्षभरापासून हे मॅजिक फाउंटन बंद पडलेले आहे. त्यामुळे करोडो रुपये खर्च करून सर्व निधी पाण्यात गेल्याचे दिसून येते.सध्या तलावाच्या विकासासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत सहा कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. मात्र या सहा कोटीचा उपयोग किल्ला तलावाला झालाच नसल्याचे येथील परिस्थिती पाहता दृष्टीस येते.सध्या किल्ला तलावात प्रवेश करण्यासाठी प्रवेश शुल्क आकारले जात असल्याकारणाने व सुविधांचा अभाव असल्याने किल्ला तलाव परिसरात येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झालेली पाहायला दिसत आहे.

एकंदरीत येथील परिस्थिती पाहता किल्ला तलाव परिसरात पाहण्यासारखे आहे तरी काय? हा प्रश्न निर्माण होतोच त्यामुळे किल्ला तलाव अधिक स्मार्ट करण्याचीही गरज व्यक्त आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply