This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

February 2025
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*वृक्षारोपण ही काळाची गरज सदगुरु सच्चिदानंद बाबा*

*वृक्षारोपण ही काळाची गरज सदगुरु सच्चिदानंद बाबा*
D Media 24

वृक्षारोपण ही काळाची गरज सदगुरु सच्चिदानंद बाबा

विश्व हिंदू परिषद बजरंग दल व विजय गोंधळी परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने बडबंजी प्लॉट निपाणी येते मोठ्या उत्साहात वृक्षारोपण साजरा करण्यात आला.

शुक्रवार दिनांक 14 जुलै रोजी बडबंजी प्लॉट येथे 30 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ येथील विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष प. पू. प्राणलिंग महास्वामीजी श्री दत्तपीठ तमनाकवाडा येथील प. पू. सद्गुरु सच्चिदानंद बाबा, रोटरी क्लबचे अध्यक्ष वीरेंद्र तारळे राजेश तीळवे, मातृशक्ती दुर्गा वहिनींच्या प्रमुख सुचित्राताई कुलकर्णी, लक्ष्मण गोंधळी, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वृक्षारोपण चा कार्यक्रम संपन्न झाला. सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचा फोटोंचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी विश्व हिंदू परिषदेचे कायदेशीर सल्लागार अँड गणेश गोंधळी म्हणाले की

मोबाईल फोन, लॅपटॉप, एसी, कार, स्वयंपाकघरातील उपकरणे… या सर्व गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनातील गरजा बनल्या आहेत. आपण वापरत असलेल्या प्रत्येक गोष्टीचां ग्रह आणि पर्यावरणावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परीणाम होतो. पृथ्वीवरील ओझे कमी करण्यासाठी व्यक्ती म्हणून आपण काहीतरी करू शकतो? एखाद्या व्यक्तीने निसर्गाला काही द्यायचे असेल तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे झाडे लावणे…. … असे मत व्यक्त केले

परमपूज्य प्राणी स्वामीजी म्हणाले की ऑक्सिजनची खरी किंमत आपल्याला कोरोनाच्या काळात कळालीच आहे तरी समाजातील प्रत्येक व्यक्तीने याची जाणीव ठेवून प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याचे मुलाप्रमाणे संगोपन केल्यास आपल्याला भविष्यात कोणती समस्या उद्भवणार नाही कारण वृक्ष हे स्वतःसाठी जगत नाही तर मनुष्य प्राणी पक्षी या सर्वांसाठी ते जगत असतात असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी सद्गुरु सच्चिदानंद महाराज म्हणाले की आपली भारतीय संस्कृती ही निसर्गात देव पाहणारे महान संस्कृती आहे आपल्या संत महात्म्याने म्हटलेच आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे एक वर्ष आपण झाडांची काळजी घेतली तर आपल्या अनेक पिढ्यांची काळजी ही झाडे घेतात विश्व परिषद बजरंग दल आणि गोंधळी परिवार यांनी केलेल्या या उपक्रमातून प्रेरणा घेऊन निपाणी परिसरातील तरुण मंडळांनी नागरिकांनी आपापल्या भागात असे वृक्षारोपण करावे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर श्रीखंडे विद्या मंदिर चे मुख्य विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर विमल भंडारे बाळकृष्ण मांगोरे यांनी विशेष परिश्रम केले

कार्यक्रमासाठी सुवर्णा गोंधळी सोम्या गोंधळी आर्या भंडारे सर्जेराव भाट किरण भट विजय गोसावी हळवणकर सर रोहन मस्के सचिन मैत्री देवा सुरवंशी यासह मोठ्या संख्येने बडबंची प्लॉट येतील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply