श्री मूर्ती नदीत विसर्जन करण्या ऐवजी श्री मूर्तीचे दान करा या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.कुर्ली गावातील नदी काठावर २३० गणेश मूर्तींचे युवक मंडळाला दान करण्यात आले.
निपाणी तालुक्यातील कुर्ली गावातील जय शिवराय युवक मंडळाने हा अनोखा उपक्रम राबवला.दरवर्षी गावातील श्री मूर्तींचे विसर्जन नदीत करण्यात येत होते.त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होत होते.
ही बाब ध्यानात घेऊन गावातील जय शिवराय युवक मंडळाने नदीच्या पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी श्री मूर्ती नदीच्या घाटावर मंडळाला दान करण्याचे आवाहन केले होते.
युवक मंडळाच्या या आवाहनाला गावातील जनतेने उत्तम प्रतिसाद दिला.गुरुवारी संपूर्ण दिवसभरात २३० गणेश मूर्तींचे दान गणेश भक्तांनी युवक मंडळाला केले.युवक मंडळाने राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.