बेळगांव:मालमत्तेच्या वादातून मंगळवार पेठ टिळकवाडी येथील एका महिलेचा खून करण्यात आला आहे.बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे टिळकवाडी भागात खळबळ उडाली आहे.दिरानेच आपल्या वहिनीचा खून केला आहे.
गीता रणजीत दावले गवळी (वय 55) असे मयत महिलेचे नाव आहे.मयत गीता हीचा दीर गणेश गवळी याने आज सकाळी दरम्यान गीतावर चाकूने सपासप वार करून तिची हत्या केली. या प्रकरणामुळे टिळकवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गणेश गवळी याला टिळकवाडी पोलिसांनी तात्काळ अटक केली. मयत गीता यांचा मृतदेह शवचिकित्सेसाठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठविण्यात आला आहे.