This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

February 2025
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*सुदृढ समाज निर्मितीसाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा  : वक्ते समाजसेवक श्री. मंजुनाथ सिंदिगार* बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या आदेशानुसार कालमनी शाळेला भेट आणि  : सिद्धेश्वर फाउंडेशन, माजी विद्यार्थी संघटना - सरकारी मराठी शाळा आणि ग्रामस्थ यांच्यावतीने विशेष व्याख्यानाचे आयोजन

*सुदृढ समाज निर्मितीसाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा  : वक्ते समाजसेवक श्री. मंजुनाथ सिंदिगार* बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या आदेशानुसार कालमनी शाळेला भेट आणि  : सिद्धेश्वर फाउंडेशन, माजी विद्यार्थी संघटना - सरकारी मराठी शाळा आणि ग्रामस्थ यांच्यावतीने विशेष व्याख्यानाचे आयोजन
D Media 24

सुदृढ समाज निर्मितीसाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा  : वक्ते समाजसेवक श्री. मंजुनाथ सिंदिगार
वाचन माणसाला जीवनात डोळसपणा निर्माण करते : वक्ते समाजसेवक श्री. मंजुनाथ सिंदिगार
स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी खडतर प्रयत्न हवे : वक्ते समाजसेवक श्री. मंजुनाथ सिंदिगार
बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या आदेशानुसार कालमनी शाळेला भेट आणि  : सिद्धेश्वर फाउंडेशन, माजी विद्यार्थी संघटना – सरकारी मराठी शाळा आणि ग्रामस्थ यांच्यावतीने विशेष व्याख्यानाचे आयोजन

बेळगाव – खानापुर , तारीख 02 डिसेंबर 2024 :  जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडून आणले गेले पाहिजे; संघर्ष, जिद्द चिकाटी मेहनत , कार्यात सातत्य कायम ठेवल्यास कोणतेही ध्येय गाठण्यासाठी वेळ लागणार नाही. प्रामाणिक खडतर प्रयत्न करून नीचित ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रम घ्यायला हवे. विविध क्षेत्रात स्पर्धा सुरू झालेल्या आहेत. त्यात शैक्षणिक क्षेत्र म्हटल की स्पर्धेसाठी जणू रसिकेच लागलेली असते. अभ्यासामध्ये दिवसरात्र एक करून ,अनेक विद्यार्थी आपले नशीब आजमावतात . पण यशस्वी तोच होतो जो योग्य मार्गदर्शन ,अचुक नियोजन, व आपल्या कार्यात सातत्य ठेवतो. निच्छित ध्येय गाठण्यासाठी अचूक नियोजन हवे. वाचन माणसाला जीवनात डोळसपणा निर्माण करते. ज्ञान माणसाला परिपक्व बनवण्यास मदत करते. विद्यार्थ्यासह मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी वाचन महत्त्वाची भूमिका निभावते. एक समाज सुदृढ समाज निर्माण निर्मितीसाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. प्रत्येकाने एक चांगला माणूस होण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. दुर्गम भागातील शाळा आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी  समाजाने प्रयत्न करून सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे. असे प्रतिपादन प्रमुख वक्ते समाजसेवक श्री. मंजुनाथ सिंदिगार यांनी “” स्पर्धात्मक युगात यशस्वी वाटचाल एक गुरुकिल्ली”” या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष  अनिल कालमनकर होते.
 कालमनी, तालुका खानापूर येथील श्री सिद्धेश्वर फाउंडेशन  आणि सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा कालमनी व माजी विद्यार्थी संघटना तसेच ग्रामस्थ यांच्यावतीने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याच प्रसंगी बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. सतीश जारकीहोळी यांच्या  मार्गदर्शन-आदेशानुसार कालमनी शाळेला भेटीचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला; शाळेला भेट देऊन संपूर्ण शाळेची पाहणी करून सर्व समस्यांची जाणीव करून घेतली; समस्या सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
व्यासपीठावरील मान्यरांच्या  हस्ते   प्रमुख वक्ते  समाजसेवक श्री. मंजुनाथ सिंदिगार यांनी “” स्पर्धात्मक युगात यशस्वी वाटचाल एक गुरुकिल्ली”” या विषयावर व्याख्यानं होते यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून केले. छत्रपती शिवाजी महाराज फोटो पूजन – समाजसेवक मारुती बडीगेर, सरस्वती व गणेश फोटो पूजन – समाजसेवक शिवा नाईक, महात्मा जोतिबा फुले सावित्रीबाई फुले फोटो पूजन – समाजसेवक आप्पय्या अष्टगी, डॉ बाबासाहेब आंबेडकर फोटो पूजन – समाजसेवक नागराज गुडदैवगोळ यांच्या हस्ते करण्यात आले.
दीपप्रज्वलन श्रीपाद भरणकर, मारुती चिगुळकर,  प्रा. निलेश शिंदे,  प्रा. शंकर गावडा, सोमाजी भरणकर, अनिल कालमनकर शाळेच्या मुख्याध्यापिका सरोजनी नाथबुवा यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी विविध मान्यवरांची भाषणे झाली.
याप्रसंगी परशराम मोरे, शिवाजी बळजी, अनंत मादर, संतोष शिंदे,  राजाभाऊ मादार, सिद्धाप्पा भरनकर, सुरेश मादार, वासुदेव नाईक, शिवाजी सावंत, मिलिंद नाईक, गणपती गुरव, हनमंत नाईक, रत्नाकर नाईक, किरण मादार, गजानन मादार, सागर गुंजिकर, सुधीर लोहार, नारायण पाटील श्रीधर पाटील, अजित पाटील, विजय पाटील, सुनिल पाटील, अमोल सुतार, रमेश मोहिते, शिवू नाईक, मंजुनाथ कांबळे उपस्थित होते.
कार्यक्रमाची  सुरुवात  शाळेतील विद्यार्थिनींच्या ईशस्तवन आणि स्वागत गीतानाने करण्यात आले. स्वागत कृष्णा भरणकर यांनी केले. प्रास्ताविक केंद्रप्रमुख विठोबा मारुती दळवी यांनी केले. परिचय तानाजी बळजी व हरिशश्चंद्र नाईक यांनी करून दिला. यावेळी सूत्रसंचालन मंजुनाथ गुंमठण व सत्यदेव नाईक यांनी केले. तर आभार सिद्धाप्पा मादर यांनी मांनले.  यावेळी विविध व्यवस्थापन कमिटीचे पदाधिकारी  सदस्य  शिक्षक प्राध्यापक विद्यार्थी पालक कर्मचारी ग्रामस्थ हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.