एस के ई सोसाइटी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने पी यु सी द्वितीय वार्षिक परिक्षेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थी वर्गाचा गौरव कार्यक्रम
सालाबाद प्रमाणे या वर्षी ही बेळगाव शहरातील पी यु सी वार्षिक परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे विविध पारितोषिक देऊन गौरव करण्यात आले.यावेळी जी एस एस पी यु कॉलेजचे विद्यार्थी कुमार ओम संदीप कुलकर्णी आणि कुमारी तीर्था एस, तसेच एस एस एस पी यु कॉलेज बेळगावची विद्यार्थीनी कुमारी अंकिता आप्पय्या मठ्ठद यांना रोख रक्कम आणि प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात आले.
अॅड.श्री रूस्तुम दर्शाअ रूतोनजी उर्फ गोलखारी पारितोषिक रोख रक्कम आणि प्रमाण पत्र देऊन कु. ओम सं. कुलकर्णी, कु. तीर्था एस., कु प्रणिषा प.चोपडे, कु.सुजल सु.कणबर्गी, कु.किरण ह. वक्कुन्द या विद्यार्थीना गौरवण्यात आले.साऊथ कोकण एम्पावरमेंट चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने विज्ञान, वाणिज्य, कला शाखेत विशेष प्राविण्य प्राप्त जी एस एस आणि आर पी डी कॉलेजच्या प्रत्येक शाखेच्या दहा विद्यार्थी वर्गास रोख रक्कम आणि प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात आले.
भौतिकशास्त्र, गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, इंग्रजी, या विषयात विशेष गुण प्राप्त जी एस एस पी यु कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम आणि प्रमाण पत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला . गरजू आणि अपेक्षित आशा विद्यार्थी वर्गास रोख रक्कम आणि प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात आले.या कार्यक्रमात बेळगाव शहरातील पटेगार समाजातील पी यु सी द्वितीय वार्षिक परिक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्याचे विशेष कलबुर्गी पारितोषिक, रोख रक्कम आणि प्रमाण पत्र देऊन गौरव करण्यात आला.
आजच्या या पारितोषिक वितरण सोहळ्यास के एल ई अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अॅण्ड रिसर्चच्या डेप्युटी रजिस्टार श्रीमती डॉ हरप्रित कौर या लाभल्या, हरप्रित कौर या अभ्यासा बरोबर खेळ आणि इतर छंद जोपासत विद्यार्थी वर्गाने अपला सर्वागींन विकास करावा, कोणते ही लक्ष पूर्ण करण्यासाठी आपली चिकाटी, परिश्रम, प्रामणिकता गरजेचे असल्याचे उद्गार व्यक्त केले.
कर्नल चंद्रनील रामणाथकर यांनी श्रीमती हरप्रित कौर यांच्या विचारांचे समर्थन करत परिश्रम आणि शिस्त असल्यास ध्येय प्राप्त करणे सोयीस्कर आहे, तसेच प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्यास भाविभविष्य साठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाची सुरुवात कुमारी पावणी आयरसंग या विद्यार्थीनीच्या स्वागत गीत व्दारा करण्यात आली.उपस्थित मान्यवर संस्थेचे व्हाईस चेअरमन, पदाधिकारी, विद्यार्थी, पालक वर्ग, प्राध्यापक यांचे स्वागत प्राचार्य एस एन देसाई यांनी केले.
प्रमुख पाहुणे, व्हाईस चेअरमन, यांचा परिचय प्रा रेश्मा संपले यांनी प्रस्तुत केला.सर्व विशेष प्राविण्यप्राप्त विद्यार्थी वर्गाचा गौरव उपस्थित करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते <span;>ओम कुलकर्णी या विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त करतेवेळी कॉलेज आणि संस्थेचे प्रति कृतज्ञता व्यक्त केली.
तसेच कुमारी तीर्था एस हिने प्राचार्य आणि प्राध्यापक यांचे मार्गदर्शन याशाचे मूळ असल्याचे उद्गार सांगत आभार व्यक्त केले.कुमारी अंकिता दोडलकनावर या विद्यार्थीनीने प्राध्यापक वर्ग हा शिक्षक आणि मित्र या दोहो रूपाने प्राप्त झाले हेच यशाचे मूळ कारण. अर्चनाआणि अपर्णा मोटार या विद्यार्थीनीने बदल आणि बदलाव करत यशाकडे जाण्याची संधी आम्हाला येथे प्राप्त झाली यांनी आम्ही प्राविण्य प्राप्त करून शकलो.
राजलक्ष्मी या विद्यार्थीनीने भावि शिक्षणासाठी जेव्हा ईतर कॉलेज मध्ये गेल्यानंतर आपल्या कॉलेजची जाणीव होत आहे.
एस के ई सोसाइटीचे व्हाईस चेअरमन श्री एस वाय प्रभू यांनी सर्व विद्यार्थी वर्गाचे अभिनंदन करीत भाविभविष्य साठी शुभेच्छा दिल्या तसेच रामणाथकर परिवाराद्वार आयोजित हा सम्मान सोहळा असाच ठेवावा आणि विद्यार्थी वर्गास प्रोत्साहन देण्याचे कार्य भविष्यात ही निरंतर ठेवावे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ किर्ती फडके आणि प्रा एस एस कुलकर्णी यांनी केले, आभार प्रदर्शन प्रा डॉ किर्ती फडके यांनी केले.